
दिवा ; निलेश घाग
पोटासाठी (रोजगारासाठी) दिवा ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज अत्यंत जीवघेणा आणि तारेवरची कसरत करावी लागत आहे. गर्दीच्या वेळी लोकल पकडण्यासाठी प्रवासी थेट रुळांवरून चालत विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढत आहेत, ज्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो प्रवाशांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुंब्रा रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती ?
▪️मुख्य मुद्दे:
जीवघेणी कसरत: दिवा स्थानकातील प्रचंड गर्दीमुळे प्रवासी रुळांवरून चालत जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये चढतात. सुरक्षेच्या अभावी अनेकजण लोकलच्या दाराबाहेर लटकून प्रवास करतात, जे अत्यंत धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा: नागरिकांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रोजचा संघर्ष रोजगारासाठी मुंबईत जाणाऱ्या दिवावासियांना पहाटेपासूनच हा जीवघेणा संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.



