
रायगड; प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी भाजप राष्ट्रवादी सत्तेपर्यंत पोहोचेल असे सांगितले जात आहे. सिंधुदुर्गात भाजपचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा एक्झीट पोल आहे. शिवसेनेला १२ ते १३ जागा, ठाकरे शिवसेनेला ८ तर अन्य पक्षाला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना ३० जागा घेऊन बहुमताकडे जाईल असे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या रायगडमध्ये ५९ जागा, रत्नागिरी ५६ तर सिंधुदुर्गात ५० जागांसाठी तर पंचायत समितीत रायगडमध्ये ११८, सिंधुदुर्गात १०० तर रत्नागिरीत ११२ जागांसाठी हे मतदान झाले होते.




