
मुंबई ; प्रतिनिधी
जयंत पाटील यांनी सांगितले की, “दादा आणि माझ्यामध्ये किमान 8-10 वेळा सविस्तर चर्चा झाली होती. बैठकीचे ठिकाण माझे घरच असायचे. पहिल्या दोन-तीन बैठकांमध्ये दादांनी साहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून पडद्यामागे काय सुरू होते, याचा सर्वात मोठा उलगडा जयंत पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, जयंत पाटील यांनी अजितदादांसोबतच्या बैठकांचे सविस्तर तपशील जाहीर केले आहेत. “दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र करून शरद पवार साहेबांच्या देखत एकसंध राष्ट्रवादी उभी करायची आहे,” अशी तीव्र भावना अजित पवारांची होती, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


